गंधाळल्या फुलांना केशर सुवास आहे
सांजावल्या क्षणांची ही वेळ खास आहे
नारीच काळ झाली नारीस जन्म देण्या
प्रेमात भावनेचा का होत ऱ्हास आहे
घोंगावते अजूनी वादळ मनातले का
वाऱ्यास ही कळेना साराच भास आहे
रानीवनी धुकेही दाटून शुभ्र आले
ओलावल्या दवांचा गवतास ध्यास आहे
तोडून प्रीत माझी गेलास का निघोनी
येशील तू पुन्हा ही हृदयात आस आहे.
रसिका
No comments:
Post a Comment