मन अशांत अशांत
कधी होईल निवांत
काहूरल्या विचारांनी
मन झाले चिंताक्रांत
स्थिरचित्त व्हावयास
करी मनन चिंतन
परी हे मन चौखूर
उंडारते रात्रंदिन
कसा घालावा लगाम
नाही रहात ताब्यात
एकामागून एक
विचार तांडे येतात
गुरुराया तूच वाली
आता उघड कवाड
पाहू दे दिव्य चरण
मन झाले फार द्वाड
शुभ सकाळ
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment