Saturday, 31 October 2020

शुभ सकाळ

 मन अशांत अशांत

कधी होईल निवांत

काहूरल्या विचारांनी

मन झाले चिंताक्रांत


स्थिरचित्त व्हावयास

करी मनन चिंतन

परी हे मन चौखूर

उंडारते रात्रंदिन


कसा घालावा लगाम

नाही रहात ताब्यात

एकामागून एक

विचार तांडे येतात


गुरुराया तूच वाली

आता उघड कवाड

पाहू दे  दिव्य चरण

मन झाले फार द्वाड


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे


No comments:

Post a Comment