तुझा हट्ट तू पूर्ण केलास
डोळ्यावर पट्टी बांधलीच
पती अंध आहे
म्हणून मला पण हे सुंदर
जग पाहण्याचा
अधिकार नाही.
तू डोळ्यावर पट्टी
बांधूनच
कुरुवंशात प्रवेश केलास.
शंभर पुत्रांची माता
झाली त्यावेळी
किती मणाचे दगड
मनावर ठेवलेस
एकदाही असे वाटले
नाही पुत्रांचे मुख
पहावे
किती मन मारले
का सवय झाली असेच
जगण्याची.
जेष्ठ पुत्राची अराजकता
डोळसपणे पाहणारी
सत्यप्रिय म्हणून
प्रसिद्ध असणारी तू
पुत्रास सावध करु
शकली नाहीस की
पुत्रप्रेमाने करू शकली
नाहीस.
धर्म आणि अधर्म यामध्ये
चाललेला रणसंग्राम
तुला कळत होता
काय न्याय्य आणि अन्याय
तुझ्या लक्षात येत होत
कारण तुझा विवेक
तुझी सत्यप्रियता.
युद्धात सगळे पुत्र
मारले गेले
दुःखाने हतबल झालेली
तू तुझा विवेक हरवून
बसली आणि
वासुदेव कृष्णास यादवी
नष्ट होण्याचा शाप
देती झालीस. का?
तू इतकी सामर्थ्यशाली
होतीस, तुला सगळं भविष्य
आधीच कळलं होतं, दिसत
होतं तरीही तू हे
पाऊल उचललस
तू निमित्त झाली
हे तर विधिलिखित होत
तो सगळं ठरवूनच
आला होता न
स्वतःचं आणि
सगळ्यांचच.
शुभ सकाळ
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment