शांता शेळके या अलवार मनाच्या कवयित्री आहेत. काळया सावळ्या मेघांनी आच्छादलेले आभाळ, पाऊस पडुन गेल्यावर त्यातून डोकावणारे सूर्यबिंब, सुस्नात धरतीला बिलगणारे कोवळे सोनसळी सूर्यकिरणे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे करण्याचे कसब शांताबाईंच्या सगळ्याच कवितांमध्ये दिसून येते. पर्जन्य राजाच्या कृपा वर्षावाने धरणी संतोषली आणि हासली.किती सुंदर कल्पना. हसरी सृष्टी पाहण्याची दृष्टी लाभलेली कसदार कवयित्री यपरिस मोठे भाग्य कोणते आपले.
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment