कवयित्री इंदिरा संत यांची औक्षण ही कविता म्हणजे हृदयाला पीळ पडणारी आर्त साद देणारी काव्य रचना आहे. सीमेवर लढणाऱ्या सैनिकाप्रती दाटून आलेल्या भावना या कवितेत कवयित्री ने मांडलेल्या आहेत. सैनिकाचे शौर्य किती मोठे आहे, त्याचे सामर्थ्य किती आहे याची तुलना करतांना लाभलेला हा जीव सुद्धा किती लहान आहे. इथे असे वाटते की त्यांनी हा थरार अनुभवला आहे की काय!
तुझे रणांगणावर जिद्दीने पडणारे पाऊल तुझ्या शौर्याचे गूज सांगून पापनकाठ ओलवतात, अशा असंख्य अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तुला औक्षण केले जाते आहे, हीच तुझे रक्षण आहे.
ओळीओळीतून, शब्दाशब्दातून कवियत्री च्या प्रतिभेचे आणि शब्द सामर्थ्याचे दर्शन आपल्याला होत जातं.
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment