वारकरी संप्रदायाच्या संत जनाबाई यांचा अभंग. भक्तीचे दुसरे रूप म्हणजे संतांची मांदियाळी. विठ्ठलाच्या भक्तीत ही इतकी रंगून गेली की तोच मी आहे म्हणजे अहं ब्रह्मासी. परमात्म्याशी इतकी एकरूप झाली आहे की, तिने परमेश्वराने माझ्याच हृदयात वास करावा म्हणून भक्तिरुप दोरीने त्याला बांधून ठेवले आहे. शब्दांच्या साखळ्या करून त्याच्या पायात बेडी रूपाने बांधल्या आहेत. अन् सतत तू अन् मी एकच आहे याचा जप तिने चालविला आहे. विठ्ठल ही हे जाणतो आणि तिच्या तत्वमसी या तत्वाला जणू मान्यता देतो.
परमेश्वर हा भावाचा भुकेला आहे, तुम्ही त्याला फक्त साद घाला तो प्रतिसाद देतोच देतो हेच तत्व सुचवायचे आहे नाम्याच्या जनीला ....
©️®️रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment