Tuesday, 11 April 2023

रसग्रहण




सुंदर भावकाव्य. बालकवी हे निसर्गप्रेमी. त्याच्या कवितेतली आई मुलाला उठवताना त्याला संस्काराचे बाळकडू सुद्धा देते आहे. तसेच निसर्गाची पण ओळख व्हावी या उद्देशाने बालकाचे लक्ष निसर्गाकडे वेधू इच्छिते. पक्षांचा कलरव,  सकाळच्या वेळी वारा हा थंड असतो तरीही चैतन्यमय असतो. पूर्वेला रवी आला म्हणजे पूर्वा ही उगवती आहे हेच तिला बाळाला शिकवायचे आहे.

बालकवी निसर्गात रमणारे आणि सृष्टी शी संवाद साधणारे कवी आहेत हेच या कवितेवरून लक्षात येत.


रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment