Tuesday, 11 April 2023

रसग्रहण

 




बा.भ.बोरकर यांची ही कविता आयुष्यात जगताना असलेले जे ठोकताळे असतात ते किती फोल आहेत ह्याची जाणीव करून देणारी कविता. 

पैलतीरावर दृष्टी लागलेल्याची काय स्थिती असू शकेल हे कवीने सांगितले आहे.

आपली आपली म्हणणारी सगळी नाती ज्यांच्याशी खूप दिवसांपासून आपण बांधलेले असतो ती सुद्धा बेसूर होतात. 

ऐन तारुण्याच्या बहरातले दिवस कसे वाकडी वाट करून निघून जातात हे सांगताना चांदणे झुरून जाते हे खूप भावतं.

वय उतरणीला लागलं नि देह पण झिजायला लागला आहे. सगळी गात्र थंडावली आहेत.

आयुष्यातले चढ उतार, प्रेम, हेवे दावे सगळचं जाणवायला लागतात. या आठवणी मन सुन्न करत जातात. 

पैलतीरावर चा अनाहत नाद ऐकायला येऊ लागतो आणि ऐलतीरा वरचे सगळेच पाश सोडून एकट्यालाच प्रवास करायचा आहे याची जाणीव होते.


रसिका राजीव हिंगे 

No comments:

Post a Comment