Tuesday, 23 May 2023

रसग्रहण

  




ज्ञानपीठ  पुरस्कार प्राप्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या कविता म्हणजे प्रतिभेला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे. त्यांच्या कवितांमुळे किती आयुष्य जगले, फुलले. प्रस्तुत कविता "समिधाच सख्या या_ कवी कुसुमाग्रज यांची ही कविता, एखाद्याच्या जीवनाचे प्रतिबिंब असू शकेल, ध्येय वादाने वाहणारी सरिता जशी किती ही अडथळे आले तरी मार्ग शोधत सागरा पर्यंत पोहचतेच.  तसेच माझ्या  काव्यात ओलावा असेल नसेलही, पण त्याची इच्छा न धरता विचारांचा अग्नी मात्र फुलावा अशी अपेक्षा कवी ची आहे. नवेपण ल्यायलेली कविता कधी कुणाचा आधार होईल, तर कधी कुणाला शाप भासेल. शाप आणि दुर्वास मुनी यांची सांगड घालून तिथे चपखल भाव प्रगट झाला आहे.  कविता म्हणजे रुक्ष समिधा अशी किती सुंदर उपमा त्यांनी सुचवली आहे. त्यांच्या प्रतिभेला त्रिवार मुजरा केल्याशिवाय राहवत नाही.


रसिका राजीव हिंगे 

No comments:

Post a Comment