रमण रणदिवे यांची बहुमोल जीवन ही कविता मानवी जीवनावर भाष्य करणारी आहे. मानवाच्या आयुष्यात सगळचं मनासारखं घडत नाही. तरीही जगणे सोडता येत नाही. प्रारब्धा नुसार येईल तो क्षण जगावाच लागतो. दुःख आहे म्हणून कोणाला जबाबदार धरता येणार नाही. सुख दुःखाचा पाठशिवणीचा खेळ सतत आयुष्यात सुरू असतो. दुःख आले म्हणून उगाच शोक करण्यात काय अर्थ आहे. रोजच्या आयुष्यात बदल होत राहतात. संकटे येतच असतात पण त्यांच्याशी लढण्यात खरा पुरुषार्थ आहे. एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणजे त्रागा करण्यात काय अर्थ? जीवनाचे चित्र रेखाटताना, सुख दुःखाचे दाखले देताना गुलाब, त्याचे काटे, वसंत ऋतू, पौर्णिमा यासारख्या उपमा दिल्या मुळे वेगळा बाज काव्याला प्राप्त झाला. कवीच्या प्रतिभेला बहर आलेला जाणवतो.
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment