Tuesday, 23 May 2023

रसग्रहण

      



     माहेर म्हणजे स्त्री च्या जीवनातील एक हळवे पण बहारदार वळण. यासाठी जेव्हा गदिमांची लेखणी बोलू लागते तेव्हा प्रत्येक स्त्री भारावली असते. नववधू जेव्हा पहिल्यांदा माहेरी येते तेव्हा सगळ्या घरादाराला अप्रूप वाटतं. कोकण तर छोटंसं. इथली माहेरवाशीण येणार म्हणजे सोहळाच. नावेत बसलेले गोमू आणि गोमुचा पती यांना पाहून नावाड्याला अतिशय आनंद झालेला आहे. गोमुच्या नवऱ्याला आपले कोकण कसे हिरवाईने नटलेले आहे, इथला निळसर सागर, फुलांचे ताटवे दाखवण्याचा नाविकाला आनंद होतो आहे. कोकणातली माणुसकी, शहाळ्या सारखी गोड रसदार माणसे म्हणजे सगळचं वेड लावणारे. वाऱ्यालाही विनंती करून गलबत जमिनीला थांबवण्याची हिंमत ग. दि.माडगूळकर  यांच्या लेखणीतून साकारली आहे. अबोली फुलांना भगवा रंगाचे ताटवे अशी उपमा देणारे गदिमा निसर्गाशी किती एकरूप झालेले आहेत. म्हणूनच त्यांच्या कविता भावतात. 


रसिका राजीव हिंगे 

No comments:

Post a Comment