ही मोरोपंतांची केकावली. केकावली म्हणजे मोराच्या आवाजातील गाणे किंवा मोराचा टाहो. जगात सुष्ट आणि दुष्ट दोन्ही प्रकारची माणसे असतात. संत सज्जनांचा सहवास सदा घडावा. संत संगतीचा परिणाम नेहमीचं चांगला होतो. खळांची व्यंकटी सांडो असे ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितले. विशेष म्हणजे वाईट गुण लगेच आत्मसात केल्या जातात,पण सद्गुण अंगी येण्यासाठी श्रद्धा असावी लागते आणि वेळ लागतो.

No comments:
Post a Comment