Sunday, 18 April 2021

सहज सुचलं म्हणून.....

 





हिंदू नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


    सकारात्मकतेची गुढी उभारू आज... आणि करू तिचे मानस पूजन... कारण मानस पूजनात जास्त शक्ती आहे.

    जसे विचार तसा आचार या न्यायाने ह्या हिंदू नवं वर्षाच्या सुमंगल पर्वावर मनात सकारात्मक विचार आणायचे... मान्य आहे सोपे नाही पण प्रयत्न करूयात. 

    सकारात्मक विचारात खूप मोठी ताकद आहे. आपल्या पूर्वजांनी वारसाच दिलाय आपल्याला. 

    श्रीराम जरी विष्णूचा अवतार असले तरी ते मानव रुपात होते. त्यांच्या सकारात्मक विचारामुळेच सागरावर सेतुबंधन झाले आणि दुष्ट शक्तीचा बिमोड झाला. अंदमानच्या काल कोठडीत सावकारांनी साहित्याचा नजराणा भारतीयांना बहाल केला केवळ सकारात्मक विचारांवर. 

    आजपासून म्हणजे चैत्र प्रतिपदेपासून शालिवाहन शक

 सुरू झाले असे म्हणतात. शालिवाहन राजाने त्याच्या सैन्यात चैतन्य निर्माण केले, सकारात्मक विचार दिले शकाचा पराभव केला आणि शालिवाहन शक सुरू झाले म्हणून गुढ्या तोरणे उभारले गेले असे इतिहास सांगतो.

    सकारात्मक विचार केले की आपल्या मनातुन हळूहळू नकारात्मकता कमी व्हायला लागते. आपण सगळे विज्ञान युगात जगणारे आहोत,प्रत्येक गोष्ट प्रयोगाने सिद्ध करून मान्य करतो.

    तसंच करून तर पाहू सकारात्मक विचार. आणि काय सिद्ध होतं ते पाहू असं मला वाटतं....


रसिका राजीव हिंगे



No comments:

Post a Comment