सुटत चाललाय बांध आता
वाटे सारी बंधने झुगारून द्यावी
नको ती संचारबंदी अन विलगीकरण
सगळंच थांबलं एकाजागी.
आणि ते देऊळ बंद
कुणी विचारत नाही, का केलं
सगळे हतबल.
कोण तो फुसका चीनचॅन
एक विषाणू सोडून देतो
आणि सगळं कालचक्र थांबवतो.
तुझ्या लक्षात आलं का देवा
वाटतं रे तुझा सहवास घडावा
गुरुराजाचे पण दार बंद
सगळीकडेच बंद बंद.
हे मी तुला विचारते आहे
काय चाललंय काय आहे
असंच जर चालू राहिले
तर सगळीकडे अवकळा पसरेल
आमच्या आराध्याची
आम्ही आराधना कशी करावी
मान्य आहे रे जळी स्थळी
काष्ठी पाषाणी चराचरी
तूच भरून आहेस
पण तरीही तू भेटावास
म्हणून म्हणते एकदातरी
तुझी माया मज दिसावी
आणि
अशीच आपुली भेट घडावी.
रसिका©️
No comments:
Post a Comment