अवसानासी नकोस गाळू
ऐसी हतबल होऊ नकोस
चौकटीतले जीवन जगणे
उंबरठ्याला सांगू नकोस
काय बरोबर किती चुकीचे
हिशोब कुणास कळले नाही
आयुष्याच्या सारीपटावर
दान हवे ते पडले नाही
घरट्यातील चिल्यापिलांना
आश्वस्त करी अश्वत्थापरी
वात्सल्याच्या पंखावरूनी
अवकाशीची उंच भरारी
घडेल ते ते घडू द्यावेत
जे मिळेल ते स्वीकारावे
अनुभवसिद्ध संध्याकाळी
सुखदुःखासी अता त्यजावे
©®रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment