जीर्ण झालीत पाने
रोजनिशीची अन् आयुष्याची पण....
एक एक अनुभवाचे पान....उलटले
किती शिल्लक आहेत पाने..कोण जाणे
त्या एका परमात्म्याशिवाय..
कर्माचे पारडे जड झाले की पुण्याचे!
हिशोब कसा लागणार?
नकळत घडलेल्या पापांचा आणि पुण्याचा पण
धनी आहेच की मी....
संचित कमी..झाले..वाढले....कशी करावी बेरीज वजाबाकी...
किती ठिकाणी ठेवल्यात खुणा...
आठवणीसाठी...कधी काटेरी..तर..
कधी सुगंधित फुलांसारख्या...विरून गेल्या..
की पुसट झाल्यात...काही कळत नाही...अन्
वळत ही नाहीत...लेखणी असते...
सोबत रोजनिशीच्या...पण आयुष्यातील..
एक एक सोबत गळत जाते...एकट्याचा...
प्रवास असतो का हा?.... नाहीच...तो...
ईश्वर...परमात्मा असतो न सोबत....
लेखणी सारखाच.......
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment